Solutions-इयत्ता नववी- राज्यशास्त्र-पाठ-३ : भारताची सुरक्षा व्यवस्था-Maharashtra Board

भारताची सुरक्षा व्यवस्था

महाराष्ट्र बोर्ड-इयत्ता नववी- राज्यशास्त्र-पाठ-3

स्वाध्याय प्रश्नोत्तरे

प्रश्न . दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

() भारताचे ........ हे सर्व संरक्षक दलांचे सरसेनापती असतात.

() प्रधानमंत्री

() राष्ट्रपती

() संरक्षण मंत्री

() राज्यपाल

उत्तर :

भारताचे राष्ट्रपती हे सर्व संरक्षक दलांचे सरसेनापती असतात.

() भारताच्या सागरी किनाऱ्याच्या रक्षणाची जबाबदारी असणारे दल -

() भूदल

() तटरक्षक दल

() सीमा सुरक्षा दल

() जलद कृति दल

उत्तर :

भारताच्या सागरी किनाऱ्याच्या रक्षणाची जबाबदारी असणारे दल - तटरक्षक दल

() विद्यार्थ्यांमध्ये शिस्त लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी ........ ची स्थापना करण्यात आली.

() बी.एस.एफ.

() सी.आर.पी.एफ.

() एन.सी.सी.

() आर..एफ.

उत्तर :

विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी एन.सी.सी. ची स्थापना करण्यात आली.

प्रश्न . पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

() मानवी सुरक्षिततेसाठी दहशतवाद नष्ट करणे आवश्यक आहे.

उत्तर :

हे विधान बरोबर आहे.

स्पष्टीकरण:

  • दहशतवादामुळे मानवी जीवनाला आणि सुरक्षिततेला थेट धोका निर्माण होतो.
  • दहशतवादाचे लक्ष्य सामान्य, निरपराध माणसे असतात. त्यांच्या मनात दहशत किंवा भीती निर्माण करणे आणि त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करणे हा दहशतवादाचा हेतू असतो.
  • दहशतवाद पसरवून आपला प्रभाव निर्माण करणे, गैरकृते करणे किंवा आर्थिक आणि राजकीय उद्दिष्ट्ये साध्य करणे यांसारखे हेतू त्यामागे असतात.
  • मानवी सुरक्षिततेमध्ये माणसांचे सर्व प्रकारच्या धोक्यांपासून संरक्षण करणे अपेक्षित आहे. त्यामुळे, मानवी सुरक्षितता टिकवण्यासाठी दहशतवाद नष्ट करणे आवश्यक आहे.

() प्रत्येक राष्ट्र स्वत:साठी भक्कम सुरक्षा व्यवस्था निर्माण करते.

उत्तर :

हे विधान बरोबर आहे.

स्पष्टीकरण :

प्रत्येक राष्ट्र स्वत:साठी भक्कम सुरक्षा व्यवस्था निर्माण करते, याची कारणे खालीलप्रमाणे आहेत:

  • राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे आणि अस्तित्वाचे रक्षण करणे हे राज्याचे पहिले कर्तव्य आणि जबाबदारी असते.
  • परराष्ट्रीय आक्रमण आणि अंतर्गत अव्यवस्थेपासून संरक्षण करणे आणि सीमारेषा सुरक्षित ठेवणे हे राष्ट्राचे प्राथमिक हितसंबंध असतात.
  • या प्राथमिक हितसंबंधांचे संरक्षण करण्यासाठी, प्रत्येक राष्ट्र राष्ट्रीय पातळीवर एक भक्कम सुरक्षा व्यवस्था निर्माण करते.
  • शेजारी देशांशी तणाव, दहशतवाद, घुसखोरी यापासून वाचण्यासाठी सुरक्षित व्यवस्था आवश्यक.
  • कोणत्याही परिस्थितीत राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी, राज्याला आपली सुरक्षा व्यवस्था कायम सज्ज आणि अद्ययावत ठेवावी लागते.

या गरजेमुळेच प्रत्येक राष्ट्र भक्कम सुरक्षा व्यवस्था तयार करते.

() भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतेच वादग्रस्त प्रश्न नाहीत.

उत्तर :

हे विधान चुकीचे आहे

स्पष्टीकरण :

भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक वादग्रस्त प्रश्न आजही अस्तित्वात आहेत. त्यामुळे “दोन्ही देशांमध्ये कोणतेच वादग्रस्त प्रश्न नाहीत” हे विधान चुकीचे ठरते.

भारत–पाक वादग्रस्त प्रश्न :

  • काश्मीर प्रश्न : दोन्ही देशांचा सर्वात जुना आणि महत्वाचा वाद. सीमा, दहशतवाद, LOC वरील संघर्ष यामुळे हा प्रश्न सतत तणाव निर्माण करतो.
  • दहशतवाद : भारत पाकिस्तानवर सीमापार दहशतवादाला आश्रय दिल्याचा आरोप करतो.
  • सीमा व पाण्याचे प्रश्न : सिर क्रीक सीमा वाद, सिंधू जल कराराशी संबंधित ताणतणाव
  • व्यापार व संपर्क : दोन्ही देशांमधील व्यापार, प्रवास आणि सांस्कृतिक देवाणघेवाण अनेकदा थांबवली जाते.

प्रश्न . पुढील संकल्पना स्पष्ट करा.

() जलद कृति दलाचे कार्य

उत्तर :

जलद कृती दलाचे मुख्य कार्य देशाच्या सुरक्षिततेस धोका निर्माण करणाऱ्या गंभीर आणि धोकादायक परिस्थितीवर नियंत्रण मिळवून जनजीवन सुरळीत करणे हे असते.

या दलाचे विशिष्ट कार्य म्हणजे:

  • जेव्हा बॉम्बस्फोट किंवा दंगे यांसारख्या घटनांमुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो.
  • अशा गंभीर व धोकादायक परिस्थितीत हे दल वेगवान हालचाली करते.
  • या वेगवान हालचाली करून जनजीवन सुरळीत करण्याचे काम जलद कृती दल करते.

() मानवी सुरक्षा

उत्तर :

मानवी सुरक्षेचा अर्थ आणि उद्देश:

  • राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे केवळ देशाची सुरक्षा नाही, तर देशात राहणाऱ्या माणसांचीही सुरक्षा होय.
  • मानवी सुरक्षेच्या विचारामध्ये माणूस केंद्रस्थानी ठेवलेला असतो. याचा मुख्य उद्देश हा आहे की, माणसांचे सर्व प्रकारच्या धोक्यांपासून संरक्षण करणे.

मानवी सुरक्षेत अपेक्षित गोष्टी:

  • मानवाला शिक्षण, आरोग्य व विकासाच्या संधी प्राप्त करून देणे अपेक्षित आहे.
  • निरक्षरता, दारिद्र्य, अंधश्रद्धा, मागासलेपणा यांसारख्या समस्या दूर करून स्वाभिमानाने सन्मानाने जगण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण करणे.
  • अल्पसंख्याक व दुर्बळ गटांच्या हक्कांचे संरक्षण करणे ही बाब मानवी सुरक्षेसाठी आवश्यक आहे.

मानवी सुरक्षेपुढील आव्हाने:

  • दहशतवाद : दहशतवादाचे लक्ष्य सामान्य, निरपराध माणसे असतात. त्यांच्या मनात भीती निर्माण करणे आणि असुरक्षिततेची भावना निर्माण करणे हा दहशतवादाचा हेतू असतो. त्यामुळे मानवी सुरक्षेसाठी दहशतवाद नष्ट करणे आवश्यक आहे.
  • पर्यावरणाचे बदल: पर्यावरणातील बदलांमुळेप्रदूषणामुळे मानवी जीवनाला धोका निर्माण झाला आहे.
  • रोगराई: एड्स, डेंग्यू, चिकनगुनिया, स्वाईन फ्लू, इबोला, कोरोना यांसारख्या रोगांनीही मोठे आव्हान निर्माण केले आहे. अशा रोगांपासून मानवाचे संरक्षण करणे हा देखील मानवी सुरक्षेचा एक घटक मानला जातो.

() गृहरक्षक दल

उत्तर :

  • गृहरक्षक दल ही स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेली एक संघटना आहे.
  • २० ते ३५ वयोगटातील स्त्री-पुरुष नागरिक यात सहभागी होऊ शकतात.
  • पोलिसांबरोबर सार्वजनिक सुरक्षितता राखणे, दंगलीच्या काळात दूध-पाणी यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे, वाहतूक व्यवस्था सांभाळणे आणि नैसर्गिक आपत्तींच्या वेळी लोकांना मदत करणे ही या दलाची कामे आहेत.

प्रश्न . पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

() राष्ट्राच्या सुरक्षेला कोणत्या बाबींपासून धोका निर्माण होतो?

उत्तर :

राष्ट्राच्या सुरक्षेला मुख्यत्वे दोन प्रकारचा धोका निर्माण होतो: बाह्य राष्ट्रांकडून होणारे आक्रमण किंवा आव्हाने आणि अंतर्गत क्षेत्रांतून निर्माण होणारी अस्थिरता

राष्ट्राच्या सुरक्षेला पुढील बाबींपासून धोका निर्माण होतो -

(१) राष्ट्राच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिल्यास.

(२) दुसऱ्या राष्ट्राने आक्रमण केल्यास.

(३) धर्म, प्रादेशिकता इत्यादी कारणांवरून देशांतर्गत बंडाळी निर्माण झाल्यास.

(४) देशात दहशतवाद वाढल्यास.

() सीमा सुरक्षा दलाची कार्ये लिहा.

उत्तर :

शांततेच्या काळात आंतरराष्ट्रीय सीमांचे रक्षण करते. सीमेवर गस्त घालणे, तस्करी रोखणे आणि सीमेवरील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे ही या दलाची प्रमुख कामे आहेत.

() मानवी सुरक्षा म्हणजे काय?

उत्तर :

देशातील माणूस केंद्रस्थानी ठेवून केलेला सुरक्षेचा विचार म्हणजे 'मानवी सुरक्षा' होय.

  • मानवी सुरक्षेत माणसांना सर्व प्रकारच्या धोक्यांपासून वाचवणे आणि त्यांना शिक्षण, आरोग्य व विकासाच्या संधी देणे अपेक्षित असते.
  • मानवी सुरक्षेचा अर्थ निरक्षरता, गरीबी, अंधश्रद्धा आणि मागासलेपणा दूर करून प्रत्येकाला सन्मानाने जगण्यासाठी योग्य वातावरण तयार करणे असा आहे.
  • अल्पसंख्याक आणि दुर्बल गटांचे हक्क सुरक्षित ठेवणे हाही मानवी सुरक्षेचा महत्त्वाचा भाग आहे.

प्रश्न . दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

() सुरक्षा दलाविषयीचा पुढील तक्ता पूर्ण करा.

सुरक्षा दलाचे नाव कार्ये प्रमुख सध्या कार्यरत प्रमुखाचे नाव
भूदल ----------- ---------- -----------
----------- ----------- ॲडमिरल -----------
----------- भारताच्या हवाई सीमा अवकाशाचे रक्षण करणे. ----------- ----------

उत्तर :

सुरक्षा दलाचे नाव कार्ये प्रमुख सध्या कार्यरत प्रमुखाचे नाव
भूदल भारताच्या भौगोलिक सीमांचे रक्षण करणे. जनरल जनरल उपेंद्र द्विवेदी
नौदल भारताच्या सागरी सीमांचे रक्षण करणे ॲडमिरल ऍडमिरल दिनेश के. त्रिपाठी
वायुदल भारताच्या हवाई सीमा व अवकाशाचे रक्षण करणे. एअर चीफ मार्शल एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग

() भारताच्या सुरक्षेपुढील आव्हाने पुढील संकल्पना चित्राच्या साहाय्याने दाखवा.

उत्तर :

PDF of this Chapter
Rs 8

-Kitabcd Academy Offer-

To Buy Notes(Rs.5)+ Solution(Rs.5) PDF of this chapter
Price : Rs.10 / Rs.8

Click on below button to buy PDF in offer (20% discount)

Click on link to get PDF from store :

PDF : इयत्ता नववी- राज्यशास्त्र-पाठ-३ : भारताची सुरक्षा व्यवस्था- नोट्स

PDF : इयत्ता नववी- राज्यशास्त्र-पाठ-३ : भारताची सुरक्षा व्यवस्था- स्वाध्याय प्रश्नोत्तरे


 PDF Set :

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- इतिहास-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स (10 PDF) Rs. 48

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- इतिहास-मराठी माध्यम सर्व धड्यांची स्वाध्याय प्रश्नोत्तरे (10 PDF) Rs. 44

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- इतिहास-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स+स्वाध्याय प्रश्नोत्तरे (20 PDF) Rs. 74

Offer  for  इयत्ता नववी- राज्यशास्त्र PDF Set :

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- राज्यशास्त्र-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स (6 PDF) Rs. 30

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- राज्यशास्त्र-मराठी माध्यम सर्व धड्यांची स्वाध्याय प्रश्नोत्तरे (6 PDF) Rs. 27

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- राज्यशास्त्र-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स+स्वाध्याय प्रश्नोत्तरे (12 PDF) Rs. 48

Offer  for इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र PDF Set :

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र- सर्व १६ धड्यांची नोट्स (16 PDF)-Rs.63

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र- सर्व १६ धड्यांची स्वध्याय प्रश्नोत्तरे (16 PDF)-Rs.58

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र- सर्व १६ धड्यांची नोट्स वस्वध्याय प्रश्नोत्तरे (32 PDF)-Rs.113

Offer  for इयत्ता-९ वी- समाजशास्त्र PDF Set :

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल - सर्व २८ धड्यांची नोट्स (28 PDF)-Rs.103

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल- सर्व २८ धड्यांची स्वध्याय प्रश्नोत्तरे (28 PDF)-Rs.98

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल- सर्व २८ धड्यांची नोट्स वस्वध्याय प्रश्नोत्तरे (56 PDF)-Rs.182

Useful Links

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *