Solutions-Marathi Medium-इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-६-लोकसंख्या-Maharashtra Board

लोकसंख्या

इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-६-महाराष्ट्र बोर्ड

स्वाध्याय प्रश्नोत्तरे

प्रश्न . खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा.

() भारतापेक्षा ब्राझीलमध्ये साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे.

उत्तर :

बरोबर

() ब्राझीलमधील लोक ईशान्य भागापेक्षा आग्नेय भागात राहणे जास्त पसंत करतात.

उत्तर :

बरोबर

() भारतातील लोकांचे आयुर्मान कमी होत आहे.

उत्तर :

चूक

() भारताच्या वायव्य भागात दाट लोकवस्ती आहे.

उत्तर :

चूक

() ब्राझीलच्या पश्चिम भागात दाट लोकवस्ती आहे.

उत्तर :

चूक

प्रश्न . दिलेल्या सुचनेनुसार प्रश्नांची उत्तरे लिहा.

() भारतातील खालील राज्यांची नावे लोकसंख्येच्या वितरणानुसार उतरत्या क्रमाने लिहा.

हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश.

उत्तर :

उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश.

() ब्राझीलमधील खालील राज्यांची नावे लोकसंख्येच्या वितरणानुसार चढत्या क्रमाने लिहा.

ॲमेझॉनस, रिओ दी जनेरीओ, अलाग्वास, सावो पावलो, पॅराना.

उत्तर :

अॅमेझॉनस, आलाग्वास, पॅराना, सावो पावलो, रिओ दी जनेरिओ.

() लोकसंख्येवर परिणाम करणाऱ्या पुढील घटकांचे अनुकूल प्रतिकूल अशा गटांत वर्गीकरण करा.

सागरी सान्निध्य, रस्त्याची कमतरता, समशीतोष्ण हवामान, उद्योगधंद्यांची उणीव, नवीन शहरे आणि नगरे, उष्ण कटिबंधीय आर्द्रवने, खनिजे, निमशुष्क हवामान, शेतीस उपयुक्त जमीन.

उत्तर :

  • लोकसंख्येवर परिणाम करणारे अनुकूल घटक : सागरी सान्निध्य, समशीतोष्ण हवामान, नवीन शहरे आणि नगरे, खनिजे, शेतीस उपयुक्त जमीन.
  • लोकसंख्येवर परिणाम करणारे प्रतिकूल घटक : रस्त्यांची कमतरता, उद्योगधंद्यांची उणीव, उष्ण कटिबंधीय आर्द्र वने, निम-शुष्क हवामान.

प्रश्न . खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

() भारत ब्राझील या देशांच्या लोकसंख्या वितरणातील साम्य फरक स्पष्ट करा.

उत्तर :

भारत व ब्राझील : लोकसंख्या वितरणातील साम्य

(i) दोन्ही देशांच्या अतिउत्तर, मध्य व वायव्य भागात लोकसंख्या विरळ आहे.

  • भारत – जम्मू आणि काश्मीर, ब्राझील – आमापा राज्य : दोन्ही अतिउत्तरेकडील भाग लोकसंख्या विरळ.
  • भारत – मध्य प्रदेश, ब्राझील – माटो ग्रासो : दोन्ही मध्य भागात लोकसंख्या विरळ.
  • भारत – थर वाळवंट (राजस्थान), ब्राझील – अ‍ॅमेझोनास राज्य : दोन्ही वायव्य भाग विरळ लोकसंख्या असलेले.

(ii) दोन्ही देशांत किनारी भागात लोकसंख्या दाट :

  • भारत – पूर्व व पश्चिम किनारे, ब्राझील – पूर्व व आग्नेय किनारे : दोन्ही किनारी भागात लोकसंख्या दाट

दोन्ही देशांमध्ये भौगोलिक अडचणी असलेल्या भागांमध्ये (जसे की पर्वत, वाळवंट, दाट अरण्य) लोकसंख्या विरळ आहे.

भारत व ब्राझील : लोकसंख्या वितरणातील फरक

क्रमांक फरकाचे मुद्दे
1 भारत : गंगा व इतर नद्यांच्या खोऱ्यांमध्ये लोकसंख्या दाट.
ब्राझील : अ‍ॅमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्या विरळ.
2 लोकसंख्या घनता (सरासरी):
भारत – ३८२ व्यक्ती/किमी (जनगणना २०११)
ब्राझील – २३ व्यक्ती/किमी (खूपच कमी)

भारतात नदीखोरे घन लोकसंख्या क्षेत्र आहेत, तर ब्राझीलमध्ये अ‍ॅमेझॉन खोरे असूनही कमी लोकसंख्या आहे.

भारत अधिक दाट वस्तीचा, ब्राझील तुलनेने कमी घनतेचा देश आहे.

() लोकसंख्या वितरण आणि हवामान यांचा सहसंबंध उदाहरणे देऊन स्पष्ट करा.

उत्तर :

  • लोकसंख्या वितरण आणि हवामान यांचा जवळचा संबंध असतो. अतिपर्जन्य किंवा कमी पर्जन्य असणाऱ्या प्रदेशांत किंवा अतिथंड अथवा अतिउष्ण अशा प्रतिकूल हवामानाच्या प्रदेशांत लोकसंख्येचे विरळ वितरण आढळते.
  • उदा., भारतातील अतिथंड हिमालयाच्या पर्वतरांगेत, थरच्या वाळवंटी भागात तसेच ब्राझीलमधील अतिपर्जन्य असणाऱ्या अॅमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्येचे विरळ वितरण आढळते.
  • सौम्य तापमान व पर्जन्याचे मध्यम प्रमाण असलेल्या प्रदेशांत लोकसंख्येचे दाट वितरण आढळते.
  • उदा., भारतातील सौम्य हवामान व मध्यम पर्जन्य असणाऱ्या गंगा नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात तसेच ब्राझीलमधील समशीतोष्ण हवामान असलेल्या आग्नेय किनारपट्टीच्या भागात लोकसंख्येचे दाट वितरण आढळते.

प्रश्न . भौगोलिक कारणे लिहा.

() लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे.

उत्तर :

नैसर्गिक संसाधनांप्रमाणेच, लोकसंख्याही कोणत्याही देशासाठी एक महत्त्वाचे संसाधन मानली जाते.

  • विकासावर प्रभाव : देशाचा आर्थिक व सामाजिक विकास हा एकूण लोकसंख्या व तिच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो.
  • अधिक लोकसंख्या आणि निम्न गुणवत्ता : जर लोकसंख्या प्रमाणापेक्षा अधिक असेल आणि तिची गुणवत्ता कमी असेल, तर देशाचा विकास संथ होतो.
  • पुरेशी लोकसंख्या आणि उच्च गुणवत्ता : जर लोकसंख्या संतुलित असेल व गुणवत्तापूर्ण असेल (उच्च शिक्षण, कुशलता, आरोग्य), तर विकास झपाट्याने होतो.

योग्य प्रमाणात व गुणवत्तेची लोकसंख्या देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे लोकसंख्येला एक महत्त्वाचे मानवी संसाधन समजले जाते.

() ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी घनता खूप कमी आहे.

उत्तर :

  • पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी सुमारे ५.६ टक्के भूभाग ब्राझीलने व्यापला आहे.
  • याउलट, जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ २.७ टक्के लोकसंख्या ब्राझीलमध्ये आढळते.
  • ब्राझीलमध्ये तुलनेने अधिक भूभाग व तुलनेने कमी लोकसंख्या आहे. त्यामुळे ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी घनता खूप कमी आहे.

() भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे.

उत्तर :

  • पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी केवळ २.४१ टक्के भूभाग भारताने व्यापला आहे.
  • याउलट, जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे १७.५ टक्के लोकसंख्या भारतात आढळते.
  • भारतात तुलनेने कमी भूभाग व तुलनेने अधिक लोकसंख्या आहे. त्यामुळे भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे.

() ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण विरळ आहे.

उत्तर :

  • ब्राझील देशातील उत्तरेकडील अॅमेझॉन नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात उष्ण व दमट हवामान, पर्जन्याचे अधिक प्रमाण, घनदाट वर्षावने, दुर्गम प्रदेश इत्यादी घटकांमुळे लोकसंख्येचे विरळ वितरण आढळते.
  • ब्राझीलमधील अॅमेझॉन नदीच्या खोऱ्यात केवळ भटक्या जमातीचे लोक टोळ्या करून राहतात.

() गंगेच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण दाट आहे.

उत्तर :

  • बिहार व पश्चिम बंगाल राज्यांतील गंगा नदीच्या खोऱ्यात पुरेसे पर्जन्यमान, सुपीक जमीन, पाण्याची उपलब्धता, सौम्य हवामान इत्यादी अनुकूल घटक आढळतात.
  • गंगा खोऱ्याचा प्रदेश शेती व विविध उद्योगांच्या विकासासाठी अनुकूल आहे. या प्रदेशात वाहतुकीचे दाट जाळे विकसित झालेले आहे. त्यामुळे गंगेच्या खोऱ्यात लोकसंख्या दाट आहे.

प्रश्न . () एक चौकिमी क्षेत्र दर्शवणाऱ्याचौकोनांमधील लोकसंख्येच्या घनतेची तुलना करून  वर्गवारी करा. () आकृतीमधील एक चिन्ह  = १०० व्यक्ती असे प्रमाण असल्यास स्त्री -पुरुष प्रमाण सांगा.

उत्तर :

(अ) 'अ' चौकोनामध्ये ७ व्यक्ती प्रति चौकिमी असल्याने येथे लोकसंख्येची घनता कमी आहे. म्हणजेच, हे क्षेत्र विरळ लोकसंख्येचे आहे.

(आ) 'आ चौकोनामध्ये १८ व्यक्ती प्रति चौकिमी असल्याने येथे लोकसंख्येची घनता जास्त आहे. म्हणजेच, हे क्षेत्र दाट लोकसंख्येचे आहे.

जर आकृती 'आ' मध्ये एक चिन्ह = १०० व्यक्ती

∴ स्त्रियांची संख्या १० x १०० = १००० असून

∴ पुरुषांची संख्या ८ x १०० = ८०० इतकी आहे.

जर पुरुषांची संख्या = १००० मानली तर स्त्रियांची संख्या =?

∴ लिंग गुणोत्तर = १००० x  = १२५०

∴ स्त्रियांची संख्या = १२५०

म्हणजेच, स्त्रियांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत अधिक आहे.

प्रश्न . आकृती .मधील लोकसंख्येच्या घनतेविषयी भाष्य करा.

 

उत्तर :

लोकसंख्येची घनता म्हणजे प्रति युनिट क्षेत्र किंवा युनिट व्हॉल्यूमची लोकसंख्या मोजणे.

आकृतीमध्ये लोकसंख्या घनता असमानपणे वितरित केली आहे:

  • जम्मू-काश्मीर सारख्या उत्तरेकडील भागात आणि सिक्किम आणि अरुणाचल प्रदेशसारख्या ईशान्य राज्यांमध्ये लोकसंख्या घनता कमी आहे.
  • पंजाब ते पश्चिम बंगालपर्यंतच्या उत्तरेकडील भागात लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे.
  • मध्य, पश्चिम आणि ईशान्य राज्यांची लोकसंख्या घनता मध्यम आहे.
  • केरळ आणि तामिळनाडूसारख्या दक्षिणी राज्यांमध्येही लोकसंख्येचे प्रमाण जास्त आहे.

PDF of this Chapter
Rs 8

-Kitabcd Academy Offer-

To Buy Notes(Rs.5)+ Solution(Rs.5) PDF of this chapter
Price : Rs.10 / Rs.8

Click on below button to buy PDF in offer (20% discount)

Click on below links to get PDF from store

PDF : महाराष्ट्र बोर्ड-इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-६-लोकसंख्या - नोट्स

PDF : महाराष्ट्र बोर्ड-इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-६-लोकसंख्या  - स्वाध्याय प्रश्नोत्तरे


PDF : इयत्ता-१० वी- भूगोल- सर्व ९ धड्यांची नोट्स (9 PDF)-Rs.45

PDF : इयत्ता-१० वी- भूगोल- सर्व ९ धड्यांची स्वाध्याय प्रश्नोत्तरे (9 PDF)-Rs.43

PDF : इयत्ता-१० वी- भूगोल- सर्व ९ धड्यांची नोट्स + स्वाध्याय प्रश्नोत्तरे (18 PDF)-Rs.71

Useful Links

Main Page : – महाराष्ट्र बोर्ड -इयत्ता-१० वी-भूगोल–  – All chapters notes, solutions, videos, test, pdf.

Previous Chapter : प्रकरण-५ : नैसर्गिक वनस्पती व प्राणी Online Solutions

Next Chapter : प्रकरण- ७ : मानवी वस्ती – Online Solutions

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *